अफजलखानाशी सामना करणाऱ्या भुईंजच्या जाधवराव स्त्रीयांची शौर्यगाथा...
एक अपरिचित इतिहास... अफजलखानाशी सामना करणाऱ्या भुईंजच्या जाधवराव स्त्रीयांची शौर्यगाथा... आदिलशाहीच्या मदमस्त हत्ती अफजल खानाने तुळजापूर, पंढरपूर आपल्या पायाखाली तुडवत कृष्णेच्या खोऱ्यात वाईमध्ये तळ ठोकला. मराठ्यांना कायमच हाताशी धरून राहिलेल्या आदिलशाहीचे हे क्रौर्याचे स्वरुप सर्वांसाठीच नवीन होते. पण अफजल खान मदोन्मत्त हत्तीप्रमाणे चौखूर उधळत होता त्याला अंगावर घेण्याची हिम्मत करायला कोणीच तयार होत नव्हते. औरंगजेबाला कैद करण्याची मनीषा बाळगणारा अफजल खान किती ताकदवान असेल याची कल्पना करता येते. असा हा खान वाईला अजगरासारखा विळखा घालून बसला होता. यातच वाईतील सर्वात सधन कसबा असणाऱ्या भुईंजवर अफजल खानाची सैतानी नजर पडली नसती तर नवलच... इकडे शिवरायांशी प्रतागडावर गाठीभेटी ठरत होत्या तर तिकडे खानाचे सैनिक भुईंज मध्ये घुसत होते. यातच जाधवरावांचे कर्ते पुरुष गावात नव्हते, पण जाधवरावांच्या गौरवशाली परंपरेनुसार जाधवरावांच्या स्त्रीयांनीच...