महालक्ष्मीच्या पायरीला कृष्णामाईचा स्पर्श झाला आणि कोल्हापूर-सांगलीचा महापूर ओसरला
भुईंजनिवासीनी (वाई.सातारा) महालक्ष्मी मंदिराच्या पाचव्या पायरीला कृष्णामाईच्या पाण्याचा स्पर्श झाला की महापूर व ओसरतो अशी लोकांमध्ये श्रद्धा आहे. अशीच एक पौराणिक कथा आहे ती म्हणजे कृष्णजन्माची... आपल्या कृष्णजन्म कथेमध्ये असे आहे की कंसमामापासून वाचविण्यासाठी, पिता वसुदेव नवजात श्रीकृष्णाला घेऊन यमुना नदी पार करायला नदीत शिरतो. यमुनेला महापूर आल्याने पलीकडे श्रीकृष्णाला सुखरूप न्यायचे कसे ? पाण्याची पातळी तर वेगाने वर चढत असते. पण ज्याक्षणी पाण्याचा स्पर्श, श्रीकृष्णाच्या पायांना होतो त्याच क्षणी चमत्कार घडतो. देवाचा चरणस्पर्श झाल्यावर यमुना नदीच्या पुराचे पाणी वेगाने ओसरते आणि वसुदेव आपल्या श्रीकृष्णाला सुरक्षितपणे पलीकडे घेऊन जातो. द्रव पदार्थ हा नेहेमी उच्च पातळीकडून खालच्या पातळीकडे वाहतो हे वैज्ञानिक तत्व आहे. पाण्याची पातळी वाढतवाढत सर्वोच्च पातळीला पोचली की कमी पातळीकडे वाहू लागते आणि ते पूर्ण रिकामे होईपर्यंत वाहत राहते. याला Siphon असे म्हणतात. एक वैज्ञानिक तत्व, एक अख्यायिका आणि एक पौराणिक कथा यांचा उत्कृष्ट मिलाफ असलेली मकरंद करंदीकर यांच्या संग्रहातील एक ...