Posts

Showing posts from January, 2022

भुईंजचा अज्ञात पानिपतवीर

Image
भुईंजचा अज्ञात पानिपतवीर ‘मर के भी जो न हटा वो - मरहट्टा’ हे ब्रीदवाक्य सार्थ करणारा मराठी अस्मितेचा सर्वात मोठा लढा म्हणजे पानिपत.. भारताचे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी मराठ्यांनी कोसो दूर जाऊन आपल्या शौर्याची पराकाष्ठा केली. ' लाख बांगडी फुटली, दोन मोती गळाले, २७ मोहरा हरवल्या आणि चिल्लरखुर्दा किती गेला याची गणना नाही. ' अशा या महाप्रचंड पानिपत शौर्ययज्ञात भुईंजच्या वीरभुमीने आपली समिधा अर्पण केली नसती तरच नवल..! ती समिधा होती.. ‘राजश्री हैबतराव जाधव भुईंजकर’ प्रतिकात्मक चित्र          ‌      पानिपतचा पत्रव्यवहार वाचत असताना 20-10-1760 रोजीचे एक पत्र हाती लागले. मराठ्यांनी उत्तरेत कुंजपुऱ्यापर्यंत मजल मारली होती. सैन्याला दिवसेंदिवस रसद कमी पडत होती, उत्तरेतील ठिकाणेदार आणि मांडलिक कोणतीही करभरणी करत नव्हते यातच पुण्यास पाठवलेल्या पत्रांनाही प्रतिउत्तर मिळत नव्हते. अशावेळी कुंजपुऱ्यावर विजय मिळवल्यानंतर तेथील वृत्तान्त नानासाहेबास कळवताना राजश्री बाळकृष्णपंत यांनी लिहिलेल्या पत्राचा मजकूर खालीलप्रमाणे..    ...