Posts

Showing posts from December, 2023

कृष्णार्जुन

Image
 कृष्णार्जुन  प्रेमाच्या विविध संकल्पना आणि व्याख्या जगभरात प्रसिद्ध आहेत. ‘आपल्या स्वत्वाच्या पलिकडे जाऊन आपण ज्याचा विचार किंवा काळजी करतो, आयुष्यातील चांगला आणि वाईट प्रसंग सर्वात आधी ज्याच्याशी बोलावा वाटतो, ज्याच्या आयुष्यात फक्त चांगले व्हावे अशी आपली प्रार्थना असते किंवा त्यासाठी आपण झटत असतो, त्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो’ अशी सहजपणे प्रेमाची व्याख्या मी करु शकतो. आई-आपत्याचे, वडिल-आपत्याचे, भावंडांचे, मैत्रीचे, जोडप्याचे असे प्रेमाचे ठोस काही प्रकार आहेत पण यात सामान्यपणे सर्वोच्च मानले जाते ते एखाद्या जोडप्याचे प्रेम ! याचे कारण की फक्त हेच प्रेम प्रेमाच्या मानसिक अवस्थेपुढे जाऊन शरीरापर्यंत पोहचते. तरीही या प्रेमास धटक देण्याची ताकद ठेवते ते मैत्री प्रेम. रक्त, शरीर अशा कोणत्याही दुव्यापलीकडे फक्त मनाने जोडलेला हा बंध.              जगात मैत्रीची अनेक उत्तमोत्तम उदाहरणे आहेत पण यातील सर्वश्रेष्ठ म्हणावे असे उदाहरण म्हणजे कृष्ण आणि अर्जुन. तसे सर्वसाधारणपणे महाभारतात सर्वोत्तम मैत्रीसाठी कर्णाचे उदाहरण दिले जाते पण मला अर्जुनाची मैत्...

लागली समाधी ज्ञानेशाची..

Image
 आळंदीत आज भलतीच गजबज उडाली होती. गेले काही दिवस नामदेव, गोरोबाकाका, सावतामाळी, चांगदेव, वटेश्वर, विसोबा खेचर अशा संतसमुदायासह स्वयं विठ्ठल परमात्मा अलंकापुरीत उपस्थित होते. वैष्णवजनांची दाटी झाली होती, कार्तिकीची वद्य एकादशी पंढरी सोडून आळंदीत सजली होती. कशासाठी ? कुणासाठी ? ज्ञाना!  वीस बावीस वर्षांचं कोवळं पोरगं समाधी घेणार..  फार लहान होती ओ लेकरं.. जेव्हा कळलं की आईबाप आपल्यासाठी, आपल्याला सोडून गेलेत. खरंतर हे कळण्याइतकही वय नव्हतं त्यांचं.  सकाळच्या प्रहरी दोघेही कुठे दिसेनात म्हणून ज्ञाना, सोपान आणि इवलुशी मुक्ता सबंध आळंदी पालथी घालत होती. इथे खोपटीत एकटा निवृत्ती उर भरून बसला होता पण हुंदका काही बाहेर येत नव्हता..  शेवटी कळलं आईबाबा गेले.. देहांत प्रायश्चित घेतलं..! तिघही पळत येऊन निवृत्तीच्या पोटास बिलगली. किती किती रडली असतील ती एवढीशी पिल्लं..  पण तरीही नियतीप्रमाणे निवृत्तीही अगदी स्तब्ध होता. ज्ञानाने ओळखले.. दोन्ही लेकरं उराशी धरली आणि तिथे पहिल्यांदा ज्ञानेश्वर 'माऊली' झाला. गहिनीनाथांकडून नाथपंथी दिक्षा स्वीकारलेल्या निवृत्तीची ब्रह्मानंद...

च्या

Image
 चा  दिवसाची तजेलदार सुरवात किंवा गप्पांची मैफिल ज्या गोष्टीशिवाय होत नाही त्यो म्हंजे चा..! आपल्याला सांगून पटायचं न्हाय, पण आपल्या रोजच्या जीवनाचा भाग झाल्याला चा दिड-दोनशे वर्षांमागं आपल्याला माहिती सुदा नव्हता. आवो एवढंच काय तर जगाला सुदा चारशे वर्षांमागं चा ची वळख नव्हती. ते चीन तेवढा मात्र दाबून चा प्यायचा..          असं म्हणत्यात की इ.स. पुर्व २७३७ मधी चीनचा राजा शैन नुंग येकदा गरम पाणी पेत होता तेवढ्यात कुठणं तरी उडून एक चहाच सुकलेलं पान त्याच्या गल्लासात पडलं. त्यामुळं त्या पाण्याला आल्याला वास, रंग आणि चव राजाला यवढी आवाडली, की गडी रोज तसाच पाणी पिऊ लागला आणि आशी झाली चहाची सुरुवात.. पण या बाटग्या मिचकुल्या डोळ्याच्यांनी, जगापास्न लय लपवून ठेवला चा...   इ.स. १६१० मधी डचांनी चा युरोपात नेला आणि मग त्यो येवढा प्रसिद्ध झाला की, आज‌घडीला पाण्याखालोखाल पेलं जाणारं दुसरं पेय म्हणजी चहा..  चीनमधी याला 'छा' म्हणायची त्यामुळ जगात बऱ्याच ठिकाणी चा, चहा, छा, चाय अशाच नावांनी वळखत्यात  भारतात चा आला इंग्रजांमुळं! पुन्हा चिन्यांनी चा ...