चंदनाला साप कवटाळी
चंदनाला साप कवटाळी मनुष्याच्या संसारीक आणि अध्यात्मिक आचरणास सर्वात योग्य संप्रदाय आजमितीस कोणता अस्तित्वात असेल तर तो म्हणजे वारकरी संप्रदाय ! वारी करणारा म्हणजे 'वारकरी' इतकी सहज याची व्याख्या आहे. "आषाढी कार्तिकी विसरु नका मज | सांगतसे गुज पांडुरंग ||" नामदेवांच्या या अभंगात आषाढी कार्तिकी या दोन वाऱ्या करण्याचा नेम स्वतः पांडुरंग घालून देतोय असे उद्धृत केले आहे. हि वारी कुणी सुरू केली हे ठामपणे सांगता येत नाही. ज्ञानेश्वरांचे वडील देखील वारी करत असत असा उल्लेख येतो. तथापि संत बहिणाबाईंच्या अभंगात वारकरी संप्रदायाची घडणावळ येते ती पुढीलप्रमाणे- संतकृपा झाली । इमारत फळा आली ।। ज्ञानदेवे घातला पाया । उभारिले देवालया ।। नामा तयाचा किंकर । तेणे केला हा विस्तार ।। जनार्दन एकनाथ । खांब दिला भागवत ।। तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ।।...