Posts

Showing posts from August, 2021

वडा पाव

Image
  वडा पाव महाराष्ट्राचं हक्काचं 'स्ट्रीट फूड'  स्ट्रीट फूड म्हणजे रस्त्याकडेच्या गाड्यावरील झटपट खाण्याचे पदार्थ.. मुळात महाराष्ट्राला ही संकल्पना फारच नवीन आहे. आज आपण जे रस्त्यावरील पदार्थ खातो ते बहुतांशी बिहारी, पंजाबी आणि उडपी आहेत. पण त्यातही सर्वांना आवडणारा आणि परवडणारा 'आपला' असा महाराष्ट्राचा वडापाव स्वतःची खासियत राखून आहे..              १६ व्या शतकात बटाटा पोर्तुगीजांसोबत भारताच्या दक्षिणी किनाऱ्यावर आला. मुळात बटाटा मुळचा दक्षिण अमेरिकेतील 'पेरु' या देशाची उपज तेथून इ.स. १५८७ मध्ये स्पॅनिश लोकांनी तो युरोपात आणला तिथे त्याचे 'कमाटा' हे नाव बदलून पोर्तुगाली 'बटाटा' हे नाव रुढ झाले. महाराष्ट्रात आजही बटाटा त्याच्या मुळ पोर्तुगीज नावानेच ओळखला जातो. पण गेल्या चारशे वर्षांत बटाटा भारतीयांच्या खाद्य संस्कृतीत असा काय मिसळला की आज त्याला भारतीयांच्या जिभेपासून दूर करणं निव्वळ अशक्य आहे..                पोर्तुगीजांची दुसरी देण म्हणजे 'पाव', (ब्रेड).. एकेकाळी पोर्तुगीज आणि ख्रिश्चन धर्मप्रसारकांसा...

फारस आणि भारत

Image
  फारस आणि भारत टाटा, होमी भाभा, सायरस पुनावाला अशा एक ना अनेक प्रसिद्ध व्यक्तींमुळे ' पारसी ' समुदाय आज आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. पण फारस (ईरान) आणि भारताचं नातं फार जुनं आणि घट्ट आहे.. भारताशी धार्मिक-सांस्कृतीक आणि दैवतांची देवाण घेवाण करणारा, हडप्पा काळात व्यापार करणारा, मराठीला शेकडोंची शब्दसंपदा देणारा, मुस्लिमांना संस्कृती आणि स्थापत्य देणारा हा फारस देश आपल्या भारताशी कधीही वेगळा न होण्याइतका घट्ट जोडला गेलाय.. आज पारसी नववर्षानिमित्त (फरवर्दिन) भारत आणि फारसच्या याच अतुट नात्याविषयी काहीसं.. आज ज्या लोकांना आपण पारसी समजतो साधारणतः ते सर्व जोरोस्ट्रिएन आहेत. ज़राथुस्ट्र (जारोस्टर) या धर्मोपदेशकाने इ.स.पुर्व पाचव्या शतकात स्थापन केलेला जगातील सर्वात जुन्या एकेश्वरवादी धर्मापैकी हा एक आहे. हा धर्म त्याचे नाते इ.स.पुर्व दोन हजार वर्षांपूर्वीच्या मुळच्या पारशी संस्कृतीशी जोडतो. ही संस्कृती भारताच्या हिंदू संस्कृतीशी साधर्म्य दाखवणारी बहूईश्वरवादी होती. या दोन्ही संस्कृतींनी इतर गोष्टींसोबतच अनेक दैवते आणि दैवी कथांची देवाण घेवाण केली.     ...

सन १८३९ ची परदेशवारी..

Image
  सन १८३९ ची परदेशवारी.. आजही परदेशात जाणें अनेकांचे स्वप्न असले तरी परदेशवारी हि लोकांसाठी तितकी आश्चर्याची गोष्ट राहिलेली नाही, किंबहुना अनेकांसाठी तर ही नित्याचीच गोष्ट झाली आहे.                पण साधारणतः २०० वर्षांपूर्वी हि गोष्ट भारतीयांसाठी इतकी सोपी नव्हती. त्यात हिंदू लोकांमध्ये तर समुद्र ओलांडणे हे महापाप समजले जाई. विलायतेला गेलेला आणि तिथल्या सामान्य इंग्रज लोकांनी पाहिलेला पहिला हिंदू व्यक्ती हा मराठी होता आणि विशेष म्हणजे तो आपल्या सातारचा होता. यशवंतराव राजे शिर्के असे त्याचे नाव. सुदैवाने या यशवंतरावास 'स्मरण वही' (डायरी) लिहायची होती.                तसे याआधी रघुनाथराव पेशव्याने आरदाशिर फारशी आणि आबा काळे असे दोन वकील लंडनला पाठवले होते. पण त्यांचा अधिक तपशील मिळत नाही त्यामुळे यशवंतरावाने लिहिलेल्या स्मरण वहीच्या माध्यमातून हिंदू लोकांच्या पहिल्या विदेश वारीतील गमती जमती आणि नुकतेच आधुनिकीकरणाचे डोहाळे लागलेले इंग्लंड आज आ...