Posts

पापविनाशक भृगुतीर्थ

Image
 भुईंज (ता.वाई जि.सातारा) च्या सौंदर्याचा गाभा म्हणजे कृष्णामाईचा घाट..! याच घाटावरील बुरुजावर हि मुर्ती कितीतरी काळापासून दुर्लक्षित आहे. खरंतर भुईंज या परिसराला फार मोठा धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. पण तरीही भुईंजचा धार्मिक इतिहास हा भृगुऋषी या नावापासून सुरु होऊन शेवटी भृगुऋषी याच नावाजवळच येऊन थांबतो...                    गरुड आणि मारुतीसह लक्ष्मीवल्लभ श्रीहरी विष्णू               हि मुर्ती आहे लक्ष्मीवल्लभ श्रीहरी विष्णुची..! समपाद अवस्थेत उभ्या असणाऱ्या चतुर्भुज मुर्तीच्या वरच्या उजव्या हातात चक्र तर डाव्या हातात शंख धारण केले असून खालच्या उजव्या हातात गदा (दंड) आणि डाव्या हाताने कटीवर बसलेल्या लक्ष्मीला सांभाळले आहे. या लक्ष्मी वल्लभाच्या उजव्या बाजूस गरुड तर डावीकडे हनुमान नमस्कार मुद्रेत उभे आहेत. विष्णु, गरुड आणि मारुतीने मुकुट परिधान केले असून लक्ष्मीच्या डोक्यावर मुकुट नाही तसेच कोणाच्याही गळ्यात व शरीरावर कोणतेही अलंकार दिसून येत नाहीत. (किंवा कालौघात नष्ट झाले असावेत.) पण प...

क्षेत्र महाबळेश्वर

Image
 प्राचिन ते अर्वाचीन इतिहास आणि संस्कृतीच्या खुणा जपणारे श्री क्षेत्र महाबळेश्वर...  क्षेत्र महाबळेश्वर महाबळेश्वर या सर्वश्रुत पर्यटनस्थळातील सर्वात सुंदर ठिकाण कोणते असेल तर ते क्षेत्र महाबळेश्वर (Old Mahableshawar).. इंग्रजांच्या सांस्कृतीक अतिक्रमणापासून अंतर राखून राहिलेले भारतीय इतिहासातील महत्त्वाचे ठिकाण ! स्कंद पुराणातील सह्याद्री खंडावर आधारित ' श्री कृष्णामाई महात्म्य ' व ' महाबळेश्वर (स्थळ) महात्म्य ' या ग्रंथांमध्ये महाबळेश्वर क्षेत्राची व पंचगंगा मंदिराची माहिती मिळते.             'महाबळेश्वर' या स्वयंभू शिवलिंगामुळे या ठिकाणास महाबळेश्वर हे नाव प्राप्त झाले असावे. शिवरुप महाबळेश्वर, विष्णुरुप अतिबळेश्वर, ब्रह्मरुप कोटेश्वर अशी शिवालये एकमेकाशेजारी आहेत. या तिन्ही मंदिरांची निर्मिती महाराष्ट्रात एकछत्री अंमल गाजवणारे देवगिरीचे सम्राट सिंघण देव (द्वितीय) यांनी इ.स. १२१५ मध्ये केली. पुढे याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी जानेवारी १६६२ मध्ये सोनोपंत डबीर यांचेकरवी जिजाऊ आईसाहेबांची सुवर्णतुला करुन फार मोठा ...

श्रीमंत सरदार राजीराव जाधवराव भुईंजकर

Image
छत्रपती शाहूंचे विश्वासू सरदार श्रीमंत रा. रा. रायाजीराव राजे जाधवराव. मृत्यू : २५ फेब्रुवारी १७२८ भुईंजकर जाधवांची शाखा जिजाऊंचे वडील लखुजीराजेंच्या थोरल्या शाखांपैकी एक शाखा आहे. लखुजीराजेंचे थोरले पुत्र दत्ताजीराजे यांचे सुपुत्र राजे यशवंतराव हे आजोबा लखुजीराजेंसोबत देवगिरीच्या किल्ल्यावर निजामाशाहीकडून कपटाने मारले गेले. याच यशवंतरावांचे पुत्र लखुजीराजे दुसरे अर्थात लखमोजी राजे हे भुईंजकर जाधवराव घराण्याचे मुळ पुरुष..  श्रीमंत सरदार रा.रा. रायाजीरावराजे जाधवराव समाधीस्थळ भुईंज.             लखमोजींचे सुपुत्र खंडोजी यांचेकडे श्री राजाराम छत्रपतींच्या काळात सिंहगडाची किल्लेदारी होती. याच खंडोजींचे सुपुत्र राजे रायाजीराव हे श्री शाहू छत्रपतींच्या दरबारात मानाचे सरदार होते. रायाजीरावांना भुईंजसह नगर जिल्ह्यातील ब्राह्मणी, महालगाव व पिंपळगाव येथील पाटीलकी व इनाम जमिनी होत्या. शाहू महाराजांच्या काळात आपल्या पराक्रमाने रायाजींनी अनेक अधिकार मिळवले. ह्यात गंगापूर महालाची चौथाई वसुली, राहुरी आणि अंमळनेरचा मोकासा आणि संपूर्ण निरथडी प्रांतातील सरंजामासाठीची...

एकाच वेळी राज्य करणारे एकाच नावाचे मराठ्यांचे दोन छत्रपती‌...

Image
  एकाच वेळी राज्य करणारे एकाच नावाचे मराठ्यांचे दोन छत्रपती‌ ... एकाच नावाच्या दोन भावांबद्दल तुम्ही कधी ऐकले आहे का ? महाराष्ट्रावर एकाच वेळी दोन सख्ख्या चुलत भावांनी राज्य केले‌ आहे. निसर्गतः हे दोन्ही बंधु एकमेकांचे प्रबळ विरोधकही होते‌‌ हे वेगळं सांगायला नको.               आपल्या पुर्वजांची नावे येणाऱ्या पिढीला देण्याची परंपरा जगभरात फार पूर्वीपासून आहे. त्यामुळे एकाच घराण्यात एकच नाव पुन्हा वापरल्याचे दिसून येते. पण एकाच पिढीत एकच नाव दोन भावांना दिल्याचे दुसरे कोणते उदाहरण ऐकिवात नाही. छत्रपती घराणेही या प्रथेस अपवाद नाही. पण एक नाव ज्याने एकाच वेळी दोन राज्यांची स्थापना केली ते नाव म्हणजे‌‌.‌‌...           "छत्रपती शिवाजी दुसरे" खरंतर या नावाची जादूच ही और आहे. स्वराज्याची स्थापना करणारे शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज ! त्यांचे नाव आपल्या आपत्यास देण्याच मोह कुणाला होणार नाही. त्यातही हा मोह शिवरायांच्याच मुलांनाच झाला नसता तर आणखी नवल..        ...

गणपती

Image
  गणपती                 ' गणानाम् अधिपती इति गणपती | ' अशी संस्कृत व्याख्या असणाऱ्या गणपती या शब्दाचा मराठी अर्थ " गणांचा अधिपती " असा होतो. शिव आणि पार्वतीचा पुत्र अशी लोकप्रिय प्रतिमा असलेल्या या देवतेने हिंदू धर्मात इष्टपुजेचे स्थान मिळवले आहे. हिंदू धर्मातील त्याला मिळालेल्या आद्य पुजेच्या बहुमानावरुन त्याची लोकप्रियता लक्षात येते. पण मुर्तीशास्त्र आणि अभ्यासक यांच्या मते गणपती हि यक्ष देवता आहे. गणपतीचे मुळ स्वरुप हे 'विघ्नकर्ता' या रुपात असून काळानुरूप गाणपत्य संप्रदायाकडून त्याचे विघ्नहर्ता असे रुपांतरण केले गेले. हिंदूंच्या पाच प्राचीन प्रमुख संप्रदायांत ह्या गाणपत्य संप्रदायाचा अंतर्भाव होतो.  गणपती हे प्रमुख उपास्य दैवत असणाऱ्या हिंदूंच्या एका संप्रदायास ' गाणपत्य संप्रदाय ' ही संज्ञा असून ह्या संप्रदायाच्या अनुयायांना ‘ गाणपत्य ’ म्हणतात. इसवी सनाच्या पाचव्या ते नवव्या शतकांच्या दरम्यान केव्हा तरी हा संप्रदाय उदयास आला असावा, असे रा. गो. भांडारकरांचे मत आहे. ह्याच कालखंडात रचलेल्या भवभूत...

सातपाटील‌ कुलवृत्तांत

Image
सातपाटील‌ कुलवृत्तांत माणूस हा मुळातच भटका प्राणी..! शेतीचा शोध लावून त्याने काहीशी स्थिरता शोधाण्याचा प्रयत्न केला खरा, पण ते त्याला अजूनही जमले नाही हे आजही मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या स्थलांतरांवरुन अगदीच स्पष्ट आहे.           तब्बल ८०० पानांच्या "सातपाटील कुलवृत्तांत" मध्ये अशी अनेको संक्रमणे सामावून घेताना लेखक रंगनाथ पठारे यांनी वाचकांना ७०० वर्षांच्या कालभ्रमंती सोबत इंग्लंड, अफगाणिस्तान पासून सातारच्या करंजे गावापर्यंतची स्थलभ्रमंती अगदी सहजपणे घडवून आणली आहे. विशेष म्हणजे इतका मोठा आवाका असूनही कोणताही धागा कुठेही सुटताना दिसत नाही. प्रत्येक घटना आणि पात्र गुलमोशीच्या फुलात फुल गुंफून तयार केलेल्या सुंदर हाराप्रमाणे हळूवार गुंतवलेले आहे. कादंबरीतील पहिले पात्र श्रीपती हे देवगिरी सत्तेच्या अखेरच्या काळातील तर शेवटचे पात्र देवनाथ एकविसाव्या शतकातील असूनही कुठेही सांस्कृतिक सरमिसळ झालेली दिसून येत नाही. याऊलट साहेबराव, दसरत, जानराव, रखमाजी, पिराजी, शंभुराव या सर्व नायकांचे अनुक्रमे निजामशाही, पानिपत युद्ध, दुसऱ्या बाजीरावाचा काळ, इंग्र...

क्षत्रिय यदुकुलोत्पन्न स्वराज्यस्वप्नदर्शक श्रीमंत महाराज लखुजीराजे जाधवराव.

Image
क्षत्रिय यदुकुलोत्पन्न स्वराज्यस्वप्नदर्शक श्रीमंत महाराज लखुजीराजे जाधवराव. रणमस्तबहाद्दर लखुजीराजे यह व्यक्ती महाराष्ट्र के इतिहास का अविभाज्य अंग हैं | परकीय रियासतोंके अत्याचारोंसे कुचले हुवे महाराष्ट्र भूमीकों स्वराज्य की प्रेरणा देणेवाले वीर के रुप में लखुजीराजेकों देखा जाता है | उनका संपूर्ण जीवन अपने लोगोंको एकजूट कर स्वराज्य की निव रखने में व्यतीत हुवा |           भारत के गौरवशाली साम्राजोमें देवगिरी के यादव साम्राज्य का स्थान हमेशा ही ऊँचा रहा है | इसी साम्राज्य के आखरी सम्राट शंकरदेवराय यादवजीको अल्लाउद्दीन खिलजीके गुलाम मलिक कफुरने छलसे हराया और देवगिरी की सत्ता हस्तगत कर ली | राजा रामदेवराय की मौत तो पहलेही इ.स. १३१० में हो चूकी थी और इस युद्ध में इ.स. १३१२ को राजा शंकरदेवराय को भी वीरगती प्राप्त हुयी | सम्राट रामदेवराय के जमाता राजा हरपालदेवनें खिलजी कें खिलाफ उठाव कियाँ किंतू उनकी बढेही निर्घृणतासें कफूर द्वारा हत्या कर दी गयी | सम्राट शंकरदेवराय के बेटे गोविंददेव जाधवजीने अनेको बार अपना राज्य फिरसे हासिल करने की कोशिश की | दुर्भाग्यसे ...