Posts

सातपाटील‌ कुलवृत्तांत

Image
सातपाटील‌ कुलवृत्तांत माणूस हा मुळातच भटका प्राणी..! शेतीचा शोध लावून त्याने काहीशी स्थिरता शोधाण्याचा प्रयत्न केला खरा, पण ते त्याला अजूनही जमले नाही हे आजही मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या स्थलांतरांवरुन अगदीच स्पष्ट आहे.           तब्बल ८०० पानांच्या "सातपाटील कुलवृत्तांत" मध्ये अशी अनेको संक्रमणे सामावून घेताना लेखक रंगनाथ पठारे यांनी वाचकांना ७०० वर्षांच्या कालभ्रमंती सोबत इंग्लंड, अफगाणिस्तान पासून सातारच्या करंजे गावापर्यंतची स्थलभ्रमंती अगदी सहजपणे घडवून आणली आहे. विशेष म्हणजे इतका मोठा आवाका असूनही कोणताही धागा कुठेही सुटताना दिसत नाही. प्रत्येक घटना आणि पात्र गुलमोशीच्या फुलात फुल गुंफून तयार केलेल्या सुंदर हाराप्रमाणे हळूवार गुंतवलेले आहे. कादंबरीतील पहिले पात्र श्रीपती हे देवगिरी सत्तेच्या अखेरच्या काळातील तर शेवटचे पात्र देवनाथ एकविसाव्या शतकातील असूनही कुठेही सांस्कृतिक सरमिसळ झालेली दिसून येत नाही. याऊलट साहेबराव, दसरत, जानराव, रखमाजी, पिराजी, शंभुराव या सर्व नायकांचे अनुक्रमे निजामशाही, पानिपत युद्ध, दुसऱ्या बाजीरावाचा काळ, इंग्र...

क्षत्रिय यदुकुलोत्पन्न स्वराज्यस्वप्नदर्शक श्रीमंत महाराज लखुजीराजे जाधवराव.

Image
क्षत्रिय यदुकुलोत्पन्न स्वराज्यस्वप्नदर्शक श्रीमंत महाराज लखुजीराजे जाधवराव. रणमस्तबहाद्दर लखुजीराजे यह व्यक्ती महाराष्ट्र के इतिहास का अविभाज्य अंग हैं | परकीय रियासतोंके अत्याचारोंसे कुचले हुवे महाराष्ट्र भूमीकों स्वराज्य की प्रेरणा देणेवाले वीर के रुप में लखुजीराजेकों देखा जाता है | उनका संपूर्ण जीवन अपने लोगोंको एकजूट कर स्वराज्य की निव रखने में व्यतीत हुवा |           भारत के गौरवशाली साम्राजोमें देवगिरी के यादव साम्राज्य का स्थान हमेशा ही ऊँचा रहा है | इसी साम्राज्य के आखरी सम्राट शंकरदेवराय यादवजीको अल्लाउद्दीन खिलजीके गुलाम मलिक कफुरने छलसे हराया और देवगिरी की सत्ता हस्तगत कर ली | राजा रामदेवराय की मौत तो पहलेही इ.स. १३१० में हो चूकी थी और इस युद्ध में इ.स. १३१२ को राजा शंकरदेवराय को भी वीरगती प्राप्त हुयी | सम्राट रामदेवराय के जमाता राजा हरपालदेवनें खिलजी कें खिलाफ उठाव कियाँ किंतू उनकी बढेही निर्घृणतासें कफूर द्वारा हत्या कर दी गयी | सम्राट शंकरदेवराय के बेटे गोविंददेव जाधवजीने अनेको बार अपना राज्य फिरसे हासिल करने की कोशिश की | दुर्भाग्यसे ...

गावकुसावरील देवता

Image
गावकुसावरील देवता  माणसाच्या सांस्कृतिक अस्तित्वापासुन देवतांचे अस्तित्व आहे असे इतिहास सांगतो तर देवतांनी सृष्टी निर्माण केली असे धर्म सांगतो. जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात भिती, प्रेम, इच्छा यांच्या माध्यमातून  निसर्गपुजक सभ्यतेने देवत्वाचा आकार घेतला. शेंदूर फासलेले दगड आणि त्यांच्यात पुजले जाणारे देवत्व न बघितलेला एकही मराठी/भारतीय व्यक्ती भेटणार नाही. माणसाच्या सांस्कृतिक उत्क्रांतीनंतर देवत्वात सुद्धा बदल होत गेले ओबडधोबड दगडांचे देव मुर्त आकार घेऊ लागले. पण यातून काही देव पिछाडीवर पडले आणि गावातून निघून वेशीवरचे धनी झाले. मरीआई साधारणतः प्रत्येक गावाच्या वेशीवर मांग वाड्यात  मरीआई हि स्त्री देवता असते. या देवतेला मरीआई-महालक्ष्मी काही ठिकाणी जरी-मरी, कडकलक्ष्मी, महामारी तर कोकणात गांवदेवी म्हटले जाते. मातंग समाज हा या देवीचा पुजारी असतो. शेंदूर फासलेले अनेक दगड मंदिरात असतात पैकी दोन मोठे पाषाण या दोन देवींच्या नावाने पुजले जातात. "मारी" हा दक्षिणी तमिळ शब्द असून तो वर्षावाचक आहे,ती पर्जन्य देवतेला वर्षनशील बनवते ती मारी असे मत दिवगंत रा. चिं. ढेरे ह्या...

हैबतबाबा पवार आरफळकर

Image
आषाढी पालखी सोहळ्याचे मालक श्रीमंत सरदार संत हैबतबाबा पवार आरफळकर  परमार वंशीय धार पवारांची एक शाखा आरफळ (ता.जि. सातारा) येथे आली. अनेकांच्या मते हि शाखा राजा धवलसिंह परमार यांची असून ती ढवळ - नांदवळ मार्गे आरफळ येथे आली. वरकरणी पाहता आरफळ गाव पवारांनीच वसवल्याचे लक्षात येते. पवारांचे कुलदैवत असणारी धारची  गडकालीका माता अर्थात काळुबाई हेच गावचे ग्रामदैवत ! तसेच गावची वंशपरंपरागत पाटीलकी देखील पवारांकडेच आहे. उत्तरकाळात आरफळ हे छत्रपतींच्या खाजगीतील गाव होते. आजही सातारा छत्रपतींच्या जमीनी आरफळ मध्ये आहेत. पवारांच्या निंबाळकर, धारेराव, जगदाळे अशा अनेक उपशाखा महाराष्ट्रभर आहेत.           आरफळकर घराणे सरदार संत हैबतबाबांमुळे नावारुपाला आले. हैबतराव पवार ग्वाल्हेरकर शिंद्यांकडे आघाडीचे सरदार होते. लष्करात असुनही बाबांची पांडुरंग आणि कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर माऊलींवर नितांत श्रद्धा होती. याच भक्तभावनेतून लष्कर सोडून ग्वाल्हेरहून आरफळकडे परतताना त्यांना एका भिल्ल राजाने कैद केले. हा भिल्ल राजा निपुत्रिक होता. हैबतबाबांना कैद केले असता पांड...

" घालीन लोटांगण " या प्रार्थनेची अज्ञात माहिती !

Image
"घालीन लोटांगण" या प्रार्थनेची अज्ञात माहिती !  ( एक श्लोक मराठी, बाकी संस्कृत ! )                          महाराष्ट्रामध्ये आपण कुठल्याही पूजेनंतर आरत्या म्हणतो. आरत्यांच्या नंतर '' घालीन लोटांगण वंदीन चरण " ही  प्रार्थना म्हणतो. आज वर्षानुवर्षे -- पिढ्यानपिढ्या हा क्रम अव्याहत सुरूच आहे. यातील पहिल्या चार ओळी या शुद्ध मराठीत असून पुढची सर्व प्रार्थना संस्कृत भाषेत आहे. असे का ? हा प्रश्न मला माझ्या लहानपणापासून पडायचा. कित्येकांना मी विचारले तरी उत्तर सापडले नाही. ही अशी प्रार्थना कुणी सुरु केली, कुणी रचली ? पहिल्या मराठी श्लोकाच्या शेवटी " म्हणे नामा " असल्यामुळे हा श्लोक संत नामदेव महाराजांचा, यात कांही वाद नाही. मग पुढचे सर्व संस्कृतमध्ये कसे ? आपल्या आधीची पिढी म्हणत होती ना, म्हणून आपण सर्वजण  " बाबा वाक्यम प्रमाणम " असे म्हणून तेच पुढे सुरु ठेवतो. मी देखील वर्षानुवर्षे श्रद्धेने म्हणत राहिलो पण याबद्दलचे औत्सुक्य कायम होते. माझ्यासारखा हाच प्रश्न आणखी कांहींना पडला असणारच आणि कुठेतरी याचे उत्तर ...

संजीवन गुप्तहेर ०८

Image
संजीवन गुप्तहेर ०८ "अनेक देवतांच्या मनात असणारे महत्कार्य आज तुझ्याकडून घडले आहे. राक्षसगुरुंच्या मृत्यूने सहजपणे राक्षसांचे समुळ उच्चाटन होईल यात दुमत नाही. तुझे मनोरथ देखील पुर्ण झाले आहे. तेव्हा आता उठ आणि चल येथून..." असे विचार त्याच्या मनात येत असताना समोर दिव्याच्या मंद प्रकाशात पर्णकुटीतील रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तो देह त्याला अगदीच निष्काम भासत होता. त्या मृतदेहाच्या मुखकमलावरचे स्मितहास्य मिणमिणत्या प्रकाशातही तेजोमय भासत होते. ते दृष्य पाहून कच मधील शिष्य आता जागा झाला. "शुक्राचार्य फक्त तुझे गुरुच नाहीत तर त्यांनी तुला दोन वेळा पुनःरोज्जीवित केले आहे. आज तुझ्यासाठी ते बलिदान द्यायलाही तयार झाले. त्यांनी तुझ्यावर इतका विश्वास ठेवला. शत्रुचा पुत्र आहेस हे माहित असूनही तुझ्यासोबत दुजाभाव केला नाही." असा त्याच्या आतील शिष्य त्याला ठणकावून सांगत होता. शेवटी अंतरीचा शिष्य वरचढ ठरला आणि कचने शुक्राचार्यांना पुनः जिवंत करण्याचा निर्णय घेतला.                   पर्णकुटीची कवाडं उघडून कच बा...

संजीवन गुप्तहेर ०७

Image
संजीवन गुप्तहेर ०७ देवयानीची विविध पुष्पांप्रती असणारी आसक्ती आता कचने पुरेपूर ओळखली होती. त्यातच वर्षातून फक्त एकदाच उमलणारे अतिशय दुर्मिळ असे हे वसंतमुखीचे पुष्प तीचे सर्वात आवडते होते. कचने हिच कडी पकडून आपली योजना आखली होती. आपल्या योजनेत कच इतका व्यग्र झाला होता की आपला शत्रु देखील आपल्यावर नजर ठेवून आहे याचा त्याला विसर पडला होता. दुसऱ्या प्रहरीच कच देवयानीचा निरोप घेऊन निबीड अरण्यात वसंतमुखीच्या शोधात निघून गेला. त्याच्यावर पाळत ठेवून असणारे राक्षस देखील सावध झाले होते. 'देवगुरुंचा पुत्र राक्षसगुरुंचा पट्टशिष्य होतो' हि सल अनेक राक्षसांच्या मनात रुतत होती.                 दुरवर अरण्यात त्याला वसंतमुखीचा दरवळ जाणवला. तो त्या दिशेने वाटचाल करु लागला. समोर वसंतमुखीचे सुंदर पुष्प कचच्या नजरेस पडले. किती सुंदर होते ते निसर्गाचे धन... पुष्प तोडण्यासाठी कचने आपला हात हळुवारपणे त्याच्या देठास घातला तेवढ्यात खड्गाच्या एका जोरदार प्रहारासह त्या फिकट रंगाच्या पुष्पावर रक्ताची गर्द लाल चिळकांडी उडाली आणि क...