Posts

वडा पाव

Image
  वडा पाव महाराष्ट्राचं हक्काचं 'स्ट्रीट फूड'  स्ट्रीट फूड म्हणजे रस्त्याकडेच्या गाड्यावरील झटपट खाण्याचे पदार्थ.. मुळात महाराष्ट्राला ही संकल्पना फारच नवीन आहे. आज आपण जे रस्त्यावरील पदार्थ खातो ते बहुतांशी बिहारी, पंजाबी आणि उडपी आहेत. पण त्यातही सर्वांना आवडणारा आणि परवडणारा 'आपला' असा महाराष्ट्राचा वडापाव स्वतःची खासियत राखून आहे..              १६ व्या शतकात बटाटा पोर्तुगीजांसोबत भारताच्या दक्षिणी किनाऱ्यावर आला. मुळात बटाटा मुळचा दक्षिण अमेरिकेतील 'पेरु' या देशाची उपज तेथून इ.स. १५८७ मध्ये स्पॅनिश लोकांनी तो युरोपात आणला तिथे त्याचे 'कमाटा' हे नाव बदलून पोर्तुगाली 'बटाटा' हे नाव रुढ झाले. महाराष्ट्रात आजही बटाटा त्याच्या मुळ पोर्तुगीज नावानेच ओळखला जातो. पण गेल्या चारशे वर्षांत बटाटा भारतीयांच्या खाद्य संस्कृतीत असा काय मिसळला की आज त्याला भारतीयांच्या जिभेपासून दूर करणं निव्वळ अशक्य आहे..                पोर्तुगीजांची दुसरी देण म्हणजे 'पाव', (ब्रेड).. एकेकाळी पोर्तुगीज आणि ख्रिश्चन धर्मप्रसारकांसा...

फारस आणि भारत

Image
  फारस आणि भारत टाटा, होमी भाभा, सायरस पुनावाला अशा एक ना अनेक प्रसिद्ध व्यक्तींमुळे ' पारसी ' समुदाय आज आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. पण फारस (ईरान) आणि भारताचं नातं फार जुनं आणि घट्ट आहे.. भारताशी धार्मिक-सांस्कृतीक आणि दैवतांची देवाण घेवाण करणारा, हडप्पा काळात व्यापार करणारा, मराठीला शेकडोंची शब्दसंपदा देणारा, मुस्लिमांना संस्कृती आणि स्थापत्य देणारा हा फारस देश आपल्या भारताशी कधीही वेगळा न होण्याइतका घट्ट जोडला गेलाय.. आज पारसी नववर्षानिमित्त (फरवर्दिन) भारत आणि फारसच्या याच अतुट नात्याविषयी काहीसं.. आज ज्या लोकांना आपण पारसी समजतो साधारणतः ते सर्व जोरोस्ट्रिएन आहेत. ज़राथुस्ट्र (जारोस्टर) या धर्मोपदेशकाने इ.स.पुर्व पाचव्या शतकात स्थापन केलेला जगातील सर्वात जुन्या एकेश्वरवादी धर्मापैकी हा एक आहे. हा धर्म त्याचे नाते इ.स.पुर्व दोन हजार वर्षांपूर्वीच्या मुळच्या पारशी संस्कृतीशी जोडतो. ही संस्कृती भारताच्या हिंदू संस्कृतीशी साधर्म्य दाखवणारी बहूईश्वरवादी होती. या दोन्ही संस्कृतींनी इतर गोष्टींसोबतच अनेक दैवते आणि दैवी कथांची देवाण घेवाण केली.     ...

सन १८३९ ची परदेशवारी..

Image
  सन १८३९ ची परदेशवारी.. आजही परदेशात जाणें अनेकांचे स्वप्न असले तरी परदेशवारी हि लोकांसाठी तितकी आश्चर्याची गोष्ट राहिलेली नाही, किंबहुना अनेकांसाठी तर ही नित्याचीच गोष्ट झाली आहे.                पण साधारणतः २०० वर्षांपूर्वी हि गोष्ट भारतीयांसाठी इतकी सोपी नव्हती. त्यात हिंदू लोकांमध्ये तर समुद्र ओलांडणे हे महापाप समजले जाई. विलायतेला गेलेला आणि तिथल्या सामान्य इंग्रज लोकांनी पाहिलेला पहिला हिंदू व्यक्ती हा मराठी होता आणि विशेष म्हणजे तो आपल्या सातारचा होता. यशवंतराव राजे शिर्के असे त्याचे नाव. सुदैवाने या यशवंतरावास 'स्मरण वही' (डायरी) लिहायची होती.                तसे याआधी रघुनाथराव पेशव्याने आरदाशिर फारशी आणि आबा काळे असे दोन वकील लंडनला पाठवले होते. पण त्यांचा अधिक तपशील मिळत नाही त्यामुळे यशवंतरावाने लिहिलेल्या स्मरण वहीच्या माध्यमातून हिंदू लोकांच्या पहिल्या विदेश वारीतील गमती जमती आणि नुकतेच आधुनिकीकरणाचे डोहाळे लागलेले इंग्लंड आज आ...

आईसाहेब म्हाळसाबाई लखुजीराजे जाधवराव.

Image
 महाराष्ट्राची अज्ञात वीरांगणा, आईसाहेब म्हाळसाबाई लखुजीराजे जाधवराव.  म्हाळसाबाईंची सर्वात सोपी ओळख म्हणजे आऊसाहेब जिजाऊंच्या आई किंवा लखुजीराजेंच्या पत्नी..! पण त्यांचं कर्तृत्व हे एवढ्यावरच सिमित होणारं नाही आहे.               म्हाळसाबाई या ‘वणंगपाळ बारा वजीरांचा काळ अशी’ ख्याती असणाऱ्या फलटणच्या वणगोजी नाईक निंबाळकर यांच्या बहिण होत्या. त्यांचे माहेरचे नाव गिरजाबाई असावे असा अंदाज इतिहास अभ्यासक मांडतात. लखुजीरावांच्या आई ठाकराईराणी देखील याच घराण्यातील होत्या त्यांच्याच मध्यस्थीने लखुजी-म्हाळसा संबंध झाला असावा. या उभयतांना चार पुत्र व जिजाऊ हि कन्या झाली.  याव्यतिरिक्त लखुजीराजेंचे यमुनाबाई व भागिरथीबाई असे आणखी दोन संबंध झाले.                   म्हाळसाऊंचे पती लखुजीराजे त्याकाळचे दख्खनेतील सर्वात मोठे सरदार होते. सुरुवातीच्या काळातच लखुजीनी स्वपराक्रमाने सिंदखेडच्या देशमुखीसह २७ महाल आणि ५२ चावड्यांची देशमुखी जहागिरी आपल्या नावे वंशपरंपरागत करुन घेतली. तर पुर्वपार असणारी पंचहजारी ...

कौलं..

Image
  खरंतर हि कौलं फार उपयुक्त..! उन्हाळ्याच्या दिवसांत पत्र्यामध्ये जाणवणारी धग या कौलात कधीच जाणवत नाही, तर हिवाळ्याच्या रात्रींमध्ये हि कौलं घराला उबदारपणा देतात. आमच्या वाड्याच्या बहुतांश भागात काळी खापरी कौलं होती तर नव्याने बांधलेल्या एका खोलीवर बँगलोरी कौलं होतं.. बँगलोरी कौलं खापरी कौलांपेक्षा जास्त मजबूत व आकर्षक असल्याने नंतर सर्वत्र त्यांचीच मागणी जास्त वाढत गेली. लहानपणी मुख्य गावातील बहुतांश घरं आणि वाड्यांवर हि काळी किंवा लाल कौलंच आपली सावली धरुन असायची.‌.! येवढच काय तर या खापरी कौलांवर भाजून केले जाणारे कितीतरी पदार्थ त्याकाळी प्रसिद्ध होते..                          पावसाळ्याच्या सुरुवातीला कुंभाराचा एक व्यक्ती न चूकता येवून उन्हाळ्यात माकडांनी केलेला उच्छाद निस्तरुन घर शेकरुन जायचा.. अशा व्यक्ती प्रत्येक गावात अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्याच असायच्या, कारण हे काम फारच कलात्मकतेने संथपणे आणि संयमाने करायची गरज असायची. त्या कुंभाराचं घर जवळच असल तरी त्या दिवशीचा त्याचा चहा नाष्टा ते जेवण सगळंच ...

पापविनाशक भृगुतीर्थ

Image
 भुईंज (ता.वाई जि.सातारा) च्या सौंदर्याचा गाभा म्हणजे कृष्णामाईचा घाट..! याच घाटावरील बुरुजावर हि मुर्ती कितीतरी काळापासून दुर्लक्षित आहे. खरंतर भुईंज या परिसराला फार मोठा धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. पण तरीही भुईंजचा धार्मिक इतिहास हा भृगुऋषी या नावापासून सुरु होऊन शेवटी भृगुऋषी याच नावाजवळच येऊन थांबतो...                    गरुड आणि मारुतीसह लक्ष्मीवल्लभ श्रीहरी विष्णू               हि मुर्ती आहे लक्ष्मीवल्लभ श्रीहरी विष्णुची..! समपाद अवस्थेत उभ्या असणाऱ्या चतुर्भुज मुर्तीच्या वरच्या उजव्या हातात चक्र तर डाव्या हातात शंख धारण केले असून खालच्या उजव्या हातात गदा (दंड) आणि डाव्या हाताने कटीवर बसलेल्या लक्ष्मीला सांभाळले आहे. या लक्ष्मी वल्लभाच्या उजव्या बाजूस गरुड तर डावीकडे हनुमान नमस्कार मुद्रेत उभे आहेत. विष्णु, गरुड आणि मारुतीने मुकुट परिधान केले असून लक्ष्मीच्या डोक्यावर मुकुट नाही तसेच कोणाच्याही गळ्यात व शरीरावर कोणतेही अलंकार दिसून येत नाहीत. (किंवा कालौघात नष्ट झाले असावेत.) पण प...

क्षेत्र महाबळेश्वर

Image
 प्राचिन ते अर्वाचीन इतिहास आणि संस्कृतीच्या खुणा जपणारे श्री क्षेत्र महाबळेश्वर...  क्षेत्र महाबळेश्वर महाबळेश्वर या सर्वश्रुत पर्यटनस्थळातील सर्वात सुंदर ठिकाण कोणते असेल तर ते क्षेत्र महाबळेश्वर (Old Mahableshawar).. इंग्रजांच्या सांस्कृतीक अतिक्रमणापासून अंतर राखून राहिलेले भारतीय इतिहासातील महत्त्वाचे ठिकाण ! स्कंद पुराणातील सह्याद्री खंडावर आधारित ' श्री कृष्णामाई महात्म्य ' व ' महाबळेश्वर (स्थळ) महात्म्य ' या ग्रंथांमध्ये महाबळेश्वर क्षेत्राची व पंचगंगा मंदिराची माहिती मिळते.             'महाबळेश्वर' या स्वयंभू शिवलिंगामुळे या ठिकाणास महाबळेश्वर हे नाव प्राप्त झाले असावे. शिवरुप महाबळेश्वर, विष्णुरुप अतिबळेश्वर, ब्रह्मरुप कोटेश्वर अशी शिवालये एकमेकाशेजारी आहेत. या तिन्ही मंदिरांची निर्मिती महाराष्ट्रात एकछत्री अंमल गाजवणारे देवगिरीचे सम्राट सिंघण देव (द्वितीय) यांनी इ.स. १२१५ मध्ये केली. पुढे याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी जानेवारी १६६२ मध्ये सोनोपंत डबीर यांचेकरवी जिजाऊ आईसाहेबांची सुवर्णतुला करुन फार मोठा ...