Posts

छत्रपती गादी

Image
छत्रपती गादी  भाग ४ (अंतिम)  इकडे सातारच्या दोन्ही छत्रपतींना १८५७ च्या उठावात सहभागी असल्याने कराची व अहमदनगर येथे नजरकैदेत ठेवले होते. पैकी छत्रपती प्रतापसिंहा चे दत्तकपुत्र तिसरे शाहू उर्फ जंगली महाराजां ना जुलै १८५८ ला सोडण्यात आले. पुढे ते पुणे येथे भवानी पेठेत राहू लागले तिथेच १ जून १८९२ रोजी त्यांचे निधन झाले.  तर छत्रपती शहाजी उर्फ आप्पासाहेब महाराजांचे दत्तकपुत्र छत्रपती व्यंकोजीराजे हे देखील कैदेतून सुटून साताऱ्यात आले. व्यंकोजीराजे हे शिवरायांचे चुलते शरीफजीराजे यांच्या वंशातील असले तरी ते सामान्य कुटुंबातील म्हणून तत्कालीन रेसिडेन्ट फ्रेयर याने आक्षेप घेतला होता, त्यामुळे छ. आप्पासाहेबांनी त्यांच्या कुटुंबास १८४३ मध्ये ' राजाज्ञा ' पदवी बहाल केली होती. भूतपूर्व छत्रपती शहाजी उर्फ आप्पासाहेबांच्या तिन्ही राणीसाहेब व इंग्रजांनी छत्रपती व्यंकोजीराजेंना छत्रपतींच्या सर्व संपत्ती, अधिकार व बिरुदावल्यांचे वारस म्हणून घोषित केले होते. (तथापि  छत्रपतींची बहुतांश स्थावर मालमत्ता इंग्रजांनी जप्त करुन घेतली होती.) छत्रपती व्यंकोजीराजेंचे २३ डिसेंबर १८६४ रोजी निपु...

छत्रपती गादी

Image
छत्रपती गादी  भाग ३  पहिल्या भागात आपण छत्रपती गादीच्या स्थापनेच्या आणि स्थिरतेच्या काळातील संघर्ष बघितला तर दुसऱ्या भागात पेशव्यांविरुद्ध दोन्ही गाद्यांचा लढा आणि रोगापेक्षा जालीम झालेले इंग्रजी औषध बघितले आता तिसऱ्या भागात इंग्रज वावटळीतही तग धरुन राहिलेल्या चिवट छत्रपती गादीचा संघर्ष पाहूयात... इंग्रज कंपनी सरकारने सातारची गादी खालसा केल्याचे पत्रक काढले असले तरी सातारच्या दोन्ही छत्रपतींना वंश मंजूर केला होता व त्यान्वये मृत छत्रपतींच्या राण्या व वारसांना थोड्याशा मालमत्तेसह तनखा सुरु केली होती. छत्रपतींचे निवासस्थान असलेला जुना राजवाडा व नवा राजवाडा देखील सरकारजमा झाले होते. यावरुनच इग्रजांचा दुटप्पीपणा लक्षात येतो की, विधीपूर्वक दत्तक विधान झाले असताना तसेच ते कागदोपत्री देखील कायदेशीररीत्या बरोबर असताना फक्त राज्य गिळंकृत करण्याच्या हेतूने इंग्रजांनी सातारच्या दोन्ही छत्रपतींना गादीवर दत्तक नामंजूर केले पण त्यांना वंशज म्हणून मान्यता दिली.  प्रतापसिंह महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांनी इंग्रजांकडून सातारला परत येण्याची परवानगी मिळवली. १८५४ साली छत्रपत...

पालीचा खंडोबा

Image
श्री म्हाळसाकांत मल्हारी मार्तंड खंडोबा यात्रा  पाली-पेंबर पालाईच्या भक्तीने शंभूघळीतला महादेव तारळी नदीकाठी प्रथमच मार्तंड भैरव नावाने द्विलिंग (जोडलिंग) रुपात शक्तीसहीत अवतरला. पुढे जेजुरीवर मणीमल्लाचा वध करुन मल्हारी नावाने पाली गावात देवांनी पहिली संसार लिला रचण्याचा निर्धार केला. याच कारणाने पाल-पेंबर हे क्षेत्र लोकपरंपरेत आणि वाघ्या मुरळीच्या कवनांमध्ये खंडोबाचे मुळठाण (मूलस्थान) म्हणून प्रसिद्ध झाले. नेवासे येथील तिमशेठ वाणी यांची माता पार्वती व मोहिनी यांचा एकत्रित अवतार असलेली कन्या म्हाळसा हिच्यासोबत देवांचा विवाह निश्चित झाला. पौष महिन्याच्या मृग नक्षत्रावर मुळठाण पाली येथे दोघांचा विवाह पार पडला.  (काहींच्या मते हा घटनाक्रम उलटा घडला अर्थात आधी लग्न व नंतर पालाईस दर्शन पण असे झाल्यास पालीत देवांनी विवाह सोहळा घडवण्याचे कारण प्रयोजनच मिळत नाही.) दुसरा एक मतप्रवाह असा की, पाली गावाचे मुळ असलेले पेंबर हे गाव प्रेमपुरी या नावाचा अपभ्रंश आहे. प्रेमपुर शब्दाचा पेंबर असा अपभ्रंश झाला असे काही ग्रंथ व जुने माहितगार लोक सांगतात.  त्यांच्या मते सप्तर्षींच्या तपास प्रसन्...

शेखमिरा संस्थान

Image
 Nawab of Wai  The princely State of pasarni  नवाब बंगला पसरणी सत्यार्थाने या नवाबास पसरणीचे नवाब म्हणून ओळखले जाते, तथापि भारतात अनेक ठिकाणी वाईचे नवाब या नावानेही यांचे उल्लेख येतात.  वाई म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतो दक्षिण काशी या बिरूदावलीने नटलेला हिंदू तीर्थक्षेत्राचा समृद्ध प्रदेश !  कृष्णमाईच्या पवित्र काठावर मंदिरांच्या दाटीवाटीने वसलेल्या या शहराच्या अगदी जवळच मुस्लीम शासकांचे संस्थान नांदत होते हे अगदी अविश्वसनीय वाटावे असे सत्य आहे. वाई शहराला अगदी खेटून महाबळेश्वरला जाणाऱ्या घाटात पसरणी नावाच्या टुमदार गावात या नवाबांची राजधानी होती. या घराण्यास "शेखमिरा" संस्थान म्हणूनही ओळखले जाते.  या घराण्यास शेखमिरा हे नाव त्याच्या मूळपुरुषावरुन पडले. स्वराज्याच्या सैन्यातील शेखमिरा हा एक मावळा. इ.स.१७०७ साली शंभूपुत्र थोरले शाहू महाराज मुघलांच्या कैदेतून मुक्त झाले आणि स्वराज्यात आले. छत्रपती पदावरून शाहूमहाराज व ताराराणींचा खटका उडाला व शाहू महाराजांनी आपला अधिकार घेण्यासाठी युद्धाची सुरुवात केली. मजल दर मजल करत शाहू चंदन-वंदन किल्यावर येऊन पोह...

चंदनाला साप कवटाळी

Image
  चंदनाला साप कवटाळी  मनुष्याच्या संसारीक आणि अध्यात्मिक आचरणास सर्वात योग्य संप्रदाय आजमितीस कोणता अस्तित्वात असेल तर तो म्हणजे वारकरी संप्रदाय ! वारी करणारा म्हणजे 'वारकरी' इतकी सहज याची व्याख्या आहे. "आषाढी कार्तिकी विसरु नका मज | सांगतसे गुज पांडुरंग ||" नामदेवांच्या या अभंगात आषाढी कार्तिकी या दोन वाऱ्या करण्याचा नेम स्वतः पांडुरंग घालून देतोय असे उद्धृत केले आहे. हि वारी कुणी सुरू केली हे ठामपणे सांगता येत नाही. ज्ञानेश्वरांचे वडील देखील वारी करत असत असा उल्लेख येतो. तथापि संत बहिणाबाईंच्या अभंगात वारकरी संप्रदायाची घडणावळ येते ती पुढीलप्रमाणे-          संतकृपा झाली । इमारत फळा आली ।।         ज्ञानदेवे घातला पाया । उभारिले देवालया ।।         नामा तयाचा किंकर । तेणे केला हा विस्तार ।।         जनार्दन एकनाथ । खांब दिला भागवत ।।         तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ।।...

छत्रपती गादी

Image
 छत्रपती गादी  भाग २  हिंदू धर्मशास्त्रानुसार दत्तक पुत्र पोटच्या पुत्राइतकाच औरस मानला जातो आणि त्याचे अधिकार व कर्तव्ये समानच असतात. साधारणतः रक्ताचा किंवा स्वकुळातील मुलगा दत्तक घेण्याचा दंडक प्रसिद्ध आहे. मागच्या भागात आपण पाहिले की शिवछत्रपतींनंतर सातारा गादीवर चौथ्या पिढीत तर करवीर गादीवर तिसऱ्याच पिढीत दत्तक वारस विराजमान झाले. दोघेही स्वकुळातील अर्थात भोसले कुळातीलच होते.  छत्रपती थोरल्या शाहू महाराजांनंतर नानासाहेब पेशव्याने सातारचे सर्वाधिकार पुण्यास हलवल्यावर पेशव्यांची सत्ता उन्मत्त होऊ लागली. सातारा व करवीर अशा दोन्ही छत्रपतींना आपले स्वातंत्र्य आणि अस्तित्व टिकवण्यासाठी पेशव्यांशी दिर्घकालीन लढा द्यावा लागला.  सातारच्या शाहूपुत्र छत्रपती रामराजांनी आपल्या मृत्यूपूर्वी वावीकर भोसले घराण्यातील विठोजी भोसले या मुलास दत्तक घेऊन त्यांचे दुसरे शाहू असे नामकरण केले. आपल्या दत्तक पित्याप्रमाणे छत्रपती दुसरे शाहू अर्थात आबासाहेब महाराज फक्त नामधारी राज्यकर्ते होते. पुण्यात प्रधान पेशव्यांमध्ये सत्तासंघर्षाचा कलह माजला होता, सवाई माधवरावास पेशवा केल्यावर बा...

छत्रपती गादी

Image
 छत्रपती गादी  क्षत्रियकुलावतंस श्रीराजा शिवछत्रपतींनी स्वतःस राजाभिषेक करवून घेत राज्यारोहण केले आणि या भूमंडळावर नवे साम्राज्य जन्मास घातले. स्वराज्याच्या स्वतंत्र लढ्यास राज्याभिषेकाने पूर्णत्व प्राप्त झाले. आजमितीस राज्याधिकार नसले तरी छत्रपती गादी अबाधित आहे. आजवर झालेल्या छत्रपती आणि त्यांच्या सत्तासंघर्षाचा थोडक्यात घेतलेला आढावा म्हणजे 'छत्रपती गादी.' भाग १ राजसिंहासनास महाराष्ट्रात "गादी/तख्त" हा शब्द प्रसिद्ध आहे. यातील तख्त हा फारसी शब्द आहे. फिरंग्यांप्रमाणे महाराष्ट्रात (भारतात) खुर्चीसारखी सिंहासने नसून ती पसरट व साधारणतः आयताकार असून त्यावर गादी अंथरुण वर विविध उंची सुवर्णजडीत वैगरे वस्त्रे अंथरुण त्यावर राजा सुखासनात विराजमान होत असे. सिंहासनावर अंथरलेल्या गादीवरुनच या आसनास "गादी" हेच नाव रुजु झाले असावे. वरकरणी ही गादी सामान्य वाटत असली तरी ती त्यावर बसणाऱ्या अगदी सर्वसामान्य व्यक्तीसही त्या राज्याचा सर्वशक्तिमान ईश्वर बनवत असे. म्हणूनच ही गादी नाती, मुल्य, भावना यांच्या लालभडक रक्ताभिषेकाने कायम रंगीत असायची.  श्रीमंत कैलासवासी थोरले स्वा...